महाराष्ट्रातील आदर्श आदिवासी गाव संकल्पना देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण I Transform Tribal Settlements into Model Villages

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत बैठक 

आदिवासी विद्यार्थ्यामध्ये प्रचंड क्रयाशीलता असते हे आपणा सर्वाना Transform Tribal Settlements into Model Villages माहिती आहे. अतिशय दुर्गम भागातून आपले आयुष्य सुकर होण्यासाठी लढणारे आदिवासी बांधव आपण अनेकदा पाहतो. या आदिवासी बांधवाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. याच आदिवासी बांधवाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी बैठक घेतली व खालील निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

संक्षिप्त बातमी Transform Tribal Settlements into Model Villages

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन:
– आदिवासी बांधवांचा विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवत आहेत.
– आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
– आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधा आणि उत्तम सेवा पुरविणे आवश्यक आहे.

आदर्श आदिवासी गावांचे प्रस्ताव:
– आदिवासी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर आदर्श आदिवासी गाव बनविणे.
– आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे.

आदर्श आदिवासी गावांचे वैशिष्ट्य:
– रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी, पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा, दर्जेदार शिक्षण, शाश्वत कृषी विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन.
– ज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना, आदिवासी बांधवांच्या सबलीकरणास मदत, आत्मविश्वास वाढवणे.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उपाय:
– ‘के जी टू पी जी’ पर्यंत उत्तम शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू करणे.
– प्रस्तावित आदिवासी विद्यापीठांमध्ये अधिक राखीव जागा देणे.
– उच्चशिक्षित आदिवासी विद्यार्थ्यांची निर्मिती करणे.

शाश्वत शेती व व्यावसायिक प्रशिक्षण:
– आदिवासी बांधवांमध्ये शाश्वत शेती व व्यावसायिक प्रशिक्षणाबद्दल जनजागृती करणे.
– विविध विभागाचे सचिव आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य आवश्यक.

‘प्रधानमंत्री जनमन योजने’ची अंमलबजावणी:
– राज्यपालांनी ‘प्रधानमंत्री जनमन योजने’च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
– आदिवासी बांधवांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ओळख दर्शविणारे कागदपत्रे वितरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश.

सरकारी बातम्या आणि निवडणुकीविषयीचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.
Transform Tribal Settlements into Model Villages

शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे

आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. Transform Tribal Settlements into Model Villages आदिवासी बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधा आणि उत्तम सेवा देवून आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे,असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी  केले.

आदिवासी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर आदर्श आदिवासी गाव बनविणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे या विषयाबाबत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आज राजभवन येथे बैठक झाली. Transform Tribal Settlements into Model Villages

आदर्श आदिवासी गाव ही कल्पना देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, राज्यात आदर्श आदिवासी गाव ही कल्पना देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल. या गावांमध्ये रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी, पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा, दर्जेदार शिक्षण, Transform Tribal Settlements into Model Villages शाश्वत कृषी विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावे. ही आदर्श गावे ज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना देण्याबरोबरच आदिवासी बांधवांच्या सबलीकरणाबरोबरच आत्मविश्वास वाढवताना मानक म्हणून काम करतील. आदिवासी बांधवांच्या  सामाजिक व सांस्कृतिक उत्थानासाठी प्रयत्न न करता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः आर्थिक विकासासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

आदिवासी विद्यापीठाची स्थापना 

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उत्तम शाळा सुरू करून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या विद्यार्थ्यांसाठी ‘के जी टू पी जी’ पर्यंतचे उत्तम शिक्षण देण्याचा शासनाचा मानस आहे. Transform Tribal Settlements into Model Villages प्रस्तावित आदिवासी विद्यापीठांमध्ये अधिकाधिक राखीव जागा देऊन आदिवासी विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. या विद्यापीठामधून उच्चशिक्षित विद्यार्थी घडले पाहिजेत. आदिवासी बांधवात शाश्वत शेती व व्यावसायिक प्रशिक्षण याबाबत जास्तीत जास्त जनजागृती करावी. यासाठी विविध विभागाचे सचिव आणि सामाजिक संस्थांचे  सहकार्य मोलाचे असणार आहे, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

प्रधानमंत्री जनमन योजनेचा आढावा

दरम्यान ‘प्रधानमंत्री जनमन योजने’च्या राज्यातील अंमलबजावणीचा आढावा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतला. यासोबतच आदिवासी बांधवांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेता यावा या बांधवांकडे ओळख दर्शविणारे कागदपत्रे वितरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यावेळी दिले.

आदिवासी विद्यार्थ्यांनी केला आनंद व्यक्त

आदिवासी बांधवाना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत असताना कसल्याही प्रकारचे अडथळे येऊ नये या साठी आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्पर रहाणे अत्यावश्यक आहे. आदिवासी बांधव मुख्य प्रवाहात यावेत यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने कराव्या अशी अपेक्षा आहे Transform Tribal Settlements into Model Villages . आदिवासी विद्यार्थांसाठी विशेष विद्यापीठाची स्थापना म्हणजे या बांधवांसाठी शिक्षण शिक्षणगंगा असेल. या बातमीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त केला.

हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/empowered-c-a-developed-india/

फॉलो करा फेसबुक पेज >>>  https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169

Leave a Comment