गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान Tech for Educating Underprivileged Students

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देणार

Tech for Educating Underprivileged Students

गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यालाही स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे यासाठी Tech for Educating Underprivileged Students अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या नाशिक येथील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि खासगी शाळेच्या विविध 50 विद्यार्थ्याच्या उपस्थितीत मंत्रालयात श्री. भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारला. 

संक्षिप्त बातमी Tech for Educating Underprivileged Students
  1. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उपलब्धता: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रस्ताव ठेवला.
  2. विद्यार्थ्यांच्या केंद्रबिंदू असलेले शिक्षण: मंत्री भुसे यांनी सांगितले की, शालेय शिक्षण विभागाचा मुख्य उद्देश विद्यार्थी हेच असतील आणि आनंददायी शिक्षण पद्धतींच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण पुरवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.
  3. शिक्षकांच्या समस्या आणि सुधारणा: विभाग शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करेल आणि त्यांना सोडवण्यासाठी ग्रामस्थ आणि पालकांचे सहकार्य प्राप्त करण्याचे आवाहन केले.
  4. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर: शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि आरोग्याचे महत्व लक्षात घेत नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल, आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
  5. शैक्षणिक परंपरा आणि महत्त्व: शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीचा इतिहास आणि परंपरा याबद्दल विचार व्यक्त केले, तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर चर्चा केली.
    सरकारी बातम्या आणि निवडणुकीविषयीचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले कीशालेय शिक्षण विभागाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असणार आहेत. Tech for Educating Underprivileged Students आनंददायी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विभाग काम करणार आहे.  राज्यात पहिली ते बारावीपर्यंतचे सव्वा दोन कोटी विद्यार्थी आहेत. एक लाख 8 हजार  शाळा असून 7 लाख 29 हजार  शिक्षक आहेत.

विविध उपक्रम योजनांसाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल. पुढील काही दिवसात शिक्षकविद्यार्थीपालकशैक्षणिक संस्था यांच्याशी चर्चा करून त्यांचे मनोगत आणि अनुभव जाणून घेणार आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात येतील. यासाठी ग्रामस्थ आणि पालकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येईल.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच आरोग्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल. Tech for Educating Underprivileged Students विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी विभाग कटिबध्द असल्याचे श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राला शैक्षणिक चळवळीचा वारसा आहे. शिक्षण क्षेत्राला देदिप्यमान परंपरा आहे. पुढेही ही परंपरा कायम राहणार असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित विविध 50 विद्यार्थ्यांनी माध्यमांशी संवाद साधलाप्रांजली जाधव या विद्यार्थिनीने महात्मा फुलेक्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह महापुरुषांनी स्त्री स्वातंत्र्यासह शिक्षणाचे महत्व पटवून दिले. याची माहिती भाषणातून दिली.

https://sarkaribatmya.in/maharashtra-to-progress-in-agriculture/

Leave a Comment