उसाच्या रसापासून करता येणार इथेनॉलची निर्मिती
येत्या ऑक्टोबर महिन्यापासून नवीन उस गाळपाचा हंगाम सुरु होणार आहे. Government Approves Ethanol Production उसाच्या गाळपापासून इथेनॉल ची निर्मितीचा प्रयोग हा अनेक देशांमध्ये यशस्वी झालेला आहे. परिणामी उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीची परवानगी कारखान्यांना देण्यात यावी हि बाब केंद्र सरकारच्या विचाराधीन होती. अखेर आज केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेत उसाचा रस, सिरप, बी-हेवी मेालॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. परिणामी या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या कारखान्यांचा इथेनॉल निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
संक्षिप्त बातमी Government Approves Ethanol Production
– केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीची परवानगी दिली: राज्य शासनाच्या वतीने CM एकनाथ शिंदे यांनी सदर निर्णयाबद्दल केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.Government Approves Ethanol Production
– गेल्या वर्षीच्या निर्बंधांचा मागोवा: डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध लागू केले होते.
– मुख्यमंत्र्यांचा पाठपुरावा: मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या निर्बंध हटवण्यासाठी केंद्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. किंबहुना अनेकदा केंद्र शासनाकडे राज्यातून प्रस्तावही पाठवण्यात आले होते.
– 2024-25 गाळप हंगामात निर्बंध हटवले: केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी देणारे निर्णय घेतले आहेत.
– साखर कारखान्यांना दिलासा: या निर्णयामुळे साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना मोठा दिलासा मिळाला आहे.
– आगामी हंगामात इथेनॉल निर्मितीची परवानगी: नव्या हंगामात उसाचा रस, सिरप, बी-हेवी मेालॅसिसपासून इथेनॉल निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
बी-हेवी मेालॅसिस या घटकांपासून इथेनॉलची निर्मिती
येत्या गाळप हंगामात उसाच्या रसा बरोबच , बी-हेवी मेालॅसिस या घटकांपासून इथेनॉलची निर्मिती करण्याची परवानगी केंद्र शासनाने दिली असून काल केंद्रीय मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला. Government Approves Ethanol Production राज्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय अतिशय महत्त्वाकांक्षी असून कारखान्यांच्या विकासाला आणि रोजगार निर्मितीला उस्फुर्त करणारा निर्णय असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केद्र शासनाच्या सहकार्याबाबत आभार व्यक्त केले आहे.
केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा
मागील वर्षाच्या शेवटीसाधारण डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारच्या मंत्रालयाने इथेनॉल निर्मितीवर कारखान्यांसाठी निर्बंध आणले होते. परिणामी ऐन गाळप हंगामात आणलेल्या या निर्बंधांमुळे साखर कारखान्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. Government Approves Ethanol Production सदर साखर कारखान्यांना उसाच्या गाळपापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी द्यावी यासाठी वेळोवेळी राज्यातील कारखान्यांकडून प्रस्ताव पाठवण्यात आले होते. यासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यांनी केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत केंद्रीय मंत्रालयाने यासाठी परवानगी द्यावी याबाबत पत्रव्यवहार केला होता.
मागील वर्षापसून घातलेले निर्बंध 2024-25 या गाळप हंगामात उठवले
अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्र शासनाच्या संबंधित मंत्रालयाने इथेनॅाल निर्मितीवर मागील वर्षापसून घातलेले निर्बंध 2024-25 या गाळप हंगामात उठवल्याची घोषणा केली आहे. केंद्र शासनाच्या या महत्वाच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांसह डिस्टिलरीजना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला हि अतिशय आनंदाची बाब आहे, असे ,महाष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रतिपादित केले.
परिणामी केंद्र सरकारच्या सदर निर्णयामुळे नव्या हंगामापासून राज्यातील साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना उसाच्या रसाबरोबरच, सिरप, बी हेवी मेालॅसिस या घटकांपासून इथेनॉल निर्मिती चा मार्ग सोपा झाला आहे.
उसाच्या थकबाकीचा प्रश्नही सोडवला जाऊ शकेल
नोव्हेंबरच्या आधीच अर्थात नवीन गाळप हंगामापूर्वीच या निर्णयाची अपेक्षा समस्त कारखान्यांना होती. डिस्टिलरीनुसार प्रमाण वाटप करण्याचा पर्याय देखील खुला राहील अशीशी देखील अपेक्षा होती. केंद्रातल्या अन्न मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने buisness line या वृत्तपत्राला याबाबत काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती. Government Approves Ethanol Production राज्याची गरज लक्षात घेता घरगुती वापरासाठी पुरेशा प्रमाणत साखर उपलब्ध होईल आणि उसाच्या थकबाकीचा प्रश्नही सोडवला जाऊ शकेल या दोन्ही पर्यायांबाबत विचार विनिमय शासन स्तरावर सुरु असल्याचे कळविण्यात आले होते.
साखर उत्पादनावर परिणाम होऊ नये याची काळजी घेणार
सदर साखर उद्योगातील तज्ज्ञांनी देखील निर्बंध उठवण्याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. साखर कारखान्यांकडून उसाच्या रसातून तसेच सिरपच्या घटकांपासून इथेनॉल ची निर्मिती उत्पादन मोठ्या प्रमाणात होणे शक्य नाही.Government Approves Ethanol Production साखर उत्पादनावर याचा कसलाही परिणाम होऊ नये याची काळजी प्रशासकीय स्तरावर राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावी लागेलअशी मत मतांतरे या तज्ञांमध्ये होती.
मागील वर्षी ऐन हंगामात इथेनॉल उत्पादनावर केंद्र सरकारने तात्काळ प्रभावाने बंदी घातली होती. साखरेच्या डायव्हर्शनसाठी तब्बल 17 लक्ष टनांची मर्यादा देखील निश्चित करून देण्यात आली होती. मात्र, नंतर अन्न मंत्रालयानच्या वतीने कारखान्यांकडे शिल्लक असलेले इथेनॉल तेल स्थानिक विपणन कंपन्यांना विकण्याची परवानगी देऊ केली होती.
मजुरांना कारखान्यात रोजगार प्राप्त होणार
2023-24 च्या साखर हंगामापर्यंत साखरेचा साठा जवळपास 85 लाख टन असू शकतो, जो सामान्य गरजेपेक्षा खूप जास्त आहे. परिणामी आता या निर्णयाचे स्वागत कारखान्यांनी केले असून इथेनॉल निर्मितीच्या परवानगीमुळे स्थानिक मजुरांना देखील कारखान्यात रोजगार प्राप्त होणार आहे.Government Approves Ethanol Production
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/maharashtra-police-hierarchy-constable-to-ips/
फॉलो करा फेसबुक पेज >>> https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169