Badlapur Incident; बदलापूर प्रकरणी प्राथमिक अहवाल सादर; शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण देणार

शिक्षण विभागासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणार

Badlapur Incident

बदलापूर येथील घटना अतिशय निर्दयी आहे. Badlapur Incident राज्यच नव्हे तर देश या घटनेमुळे हादरला. या घटनेला आता आठ दिवसांचा अवधी उलटून गेला आहे. परिणामी राज्यभर शाळांमध्ये अशा घटना घडू नये म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहे. शाळेतील मुलींना सक्षम आणि निर्भय बनवण्यासाठी महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करताना पाहायला मिळत आहे. यासाठीच सदर घटनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. त्यात खालील बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

संक्षिप्त बातमी Badlapur Incident

– बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिरमधील दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक अहवाल सादर केला.
– अहवाल सादर करणारी समिती: शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांची.
– अहवालातील निरीक्षणे तपास यंत्रणांना सादर केली जातील.
– शिक्षण विभागांतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येईल.
– शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्या चौकशीनुसार:
– अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत सेविका असणे आवश्यक होते.
–  Badlapur Incident चौकशी दरम्यान सेविका अनुपस्थित राहिल्या.

– ज्यांना घटनेची माहिती मिळाली त्यांनी ती वरिष्ठांना कळवली का नाही, याचा तपास.
– शाळेतील संबंधित शिक्षिका आणि मुख्याध्यापकांना नोटीस देण्यात येणार.
– दोषी ठरलेल्यांना पाठिशी घातले जाणार नाही.
– मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाने घेतली.
– शाळांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना:
– सीसीटीव्ही लावणे आणि रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवणे.
– स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे.
– महिलांसाठी मोबाईलवर पॅनिक बटनाची योजना.
– राज्यातील सर्व शाळांमध्ये पॅनिक बटन देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

सरकारी बातम्या आणि निवडणुकीविषयीचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.

स्वतंत्र हेल्पलाईन सुरू Badlapur Incident

बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिरमध्ये घडलेल्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने समिती नेमली होती. या समितीत नेमलेल्या राज्य शासनाचे शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. Badlapur Incident अहवालातील सविस्तर निरीक्षणे तपास यंत्रणांना सादर करण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाअंतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला

शिक्षण विभागाच्या वतीने  आदर्श विद्या मंदिर  बदलापूर येथील शाळेमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांच्या उपस्थितीत शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर केला.  हा चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी राज्य सरकारचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संवाद साधला.

सखोल तपास करण्याची तपास यंत्रणांना शिफारस 

या अहवालाची माहिती देताना केसरकर म्हणाले, या अहवालातील निरीक्षणांनुसार अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत सेविका असणे आवश्यक होते. चौकशीदरम्यान आपले म्हणणे मांडण्याची संधी होती परंतु चौकशीला त्या अनुपस्थित राहिल्या आहेत. परिणामी त्यांचे काही म्हणणे नाही असे गृहीत धरुन त्यांना या प्रकरणी सहआरोपी करावे. किंबहुना ज्यांना या घटनेची माहिती मिळाली त्यांनी ती तत्काळ आपल्या वरिष्ठांना कळवले किं नाही? याचा तपास करण्याची शिफारस तपास यंत्रणांना करण्यात येत आहे.

मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाने घेतली

या अनुषंगाने शाळेतील संबंधित शिक्षिका, मुख्याध्यापक यांना नोटीस देण्यात येणार आहे. घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, दोषी ठरलेल्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाने घेतली असल्याची माहिती मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी दिली.

विवध उपाययोजना करण्यासंदर्भात शासन तत्पर

महिला मुलींना राज्यात सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे. यात सर्वात महत्वाची उपाययोजना म्हणजे मुलींना बाल वयातच स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. Badlapur Incident महिला मुलींना मानसिक दृष्ट्या निर्भय बनवण्यासाठी देखील शासन स्तरावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. शासनाच्या वतीने शाळेत स्वयंसिद्धा अर्थात स्वसंरक्षण धडे देण्यात येणार आहेत.

महिलांवरील अन्याय टाळण्यासाठी मोबाईलवर पॅनिक बटन

शाळांच्या सुरक्षेसाठी आणि मुलांच्या संरक्षणासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. महिलांवरील अन्याय टाळण्यासाठी मोबाईलवर पॅनिक बटन देता येईल, यासाठी महिला व बालविकास तसेच गृहविभागामार्फत निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये राज्यभरातील प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कार्यान्वित करण्या बरोबरच  अति महत्वाचे रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवणे आदींचा सुरक्षेविशयक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. शाळांमध्ये बाल वयातच स्वसंरक्षण आणि मानसिक बळ देण्याबाबत उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये असे पॅनिक बटण देता येईल, यासाठी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी यावेळी दिली.

हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/empowered-c-a-developed-india/

फॉलो करा फेसबुक पेज >>>  https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169

Leave a Comment