लाल किल्ला परिसरात भारत पर्व महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार असून या महोत्सवास Maharashtra’s ‘Honey Village’ Republic Day महाराष्ट्र राज्याचा ‘मधाचे गाव‘ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ असणार आहे.
26 ते 29 जानेवारी दरम्यान भारतपर्व महोत्सव
दरवर्षी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने लाल किल्ला येथे भारतपर्व महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त केले जाते. यावर्षी या महोत्सवात महाराष्ट्राचा चित्ररथ दर्शविण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह बारा राज्यातील चित्ररथ ही इथे असणार आहेत. दिनांक 26 ते 29 जानेवारी दरम्यान भारतपर्व महोत्सव चालेल.
https://sarkaribatmya.in/maharashtra-palakmantri-list-2025/
संक्षिप्त बातमी
- भारत पर्व महोत्सव: लाल किल्ला परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व महोत्सवाचे आयोजन.
- महाराष्ट्राचा चित्ररथ: Maharashtra’s ‘Honey Village’ Republic Day यावर्षी महाराष्ट्र राज्याचा ‘मधाचे गाव’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ प्रदर्शनात असणार.
- महोत्सवाची तारीख: भारत पर्व महोत्सव 26 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजित केला जाईल.
- सुवर्ण भारत संकल्पना: ‘सुवर्ण भारत: वारसा आणि विकास’ ही मध्यवर्ती संकल्पना यावर्षीच्या चित्ररथांसाठी आहे.
- मधाचे गाव योजना: महाराष्ट्र सरकारने 2022 मध्ये ‘मधाचे गाव’ ही योजना सुरू केली, ज्याचा उद्देश स्थानिक रोजगार निर्मिती आणि गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आहे.
- चित्ररथाची रचना:
- पुढचा भाग: फुलांनी सजवलेली मधमाशीची आकर्षक शिल्प आणि तिच्या भोवती लहान मधमाशा व फुलांची प्रतिकृती.
- भव्य मधमाशीचे पंख: पंखांची हालचाल दाखवणारी आणि हवेत उडणाऱ्या लहान मधमाशा.
- मागील भाग: विशाल मधमाशाचे पोळ, मध उत्पादनाचे टप्पे, व्यवसायातील उप-उत्पादने आणि फुलांच्या परागीकरणातून रस शोषण करणारी मधमाशी.
- गावांची नावे: मधाचे गाव योजनेत समाविष्ट असलेल्या काही गावांची नावे खोक्यांवर लिहिली जाणार आहेत.
- सांस्कृतिक कार्यमंत्री व मार्गदर्शन: चित्ररथ सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून तयार झाला.
- सांस्कृतिक विभागाचे योगदान: चित्ररथ तयार करण्याची माहिती सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.
सुवर्ण भारत: वारसा आणि विकास संकल्पना
Maharashtra’s ‘Honey Village’ Republic Day
हे वर्ष संविधानाचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे केले जात असून, यावर्षी चित्ररथांसाठी Suvarn Bharat Varsa ‘सुवर्ण भारत: वारसा आणि विकास‘ ही मध्यवर्ती संकल्पना आहे. या संकल्पनेच्या आधारावर महाराष्ट्र राज्याने Madhache gaav ‘मधाचे गाव‘ असा चित्ररथ तयार केला. Maharashtra’s ‘Honey Village’ Republic Day
पर्यावरणाचे महत्व अधोरेखित
मधमाशांचे पर्यावरणाच्या आणि मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.मधाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेऊन, स्थानिक रोजगार निर्मिती आणि उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी, Maharashtra’s ‘Honey Village’ Republic Day महाराष्ट्र शासनाने 2022 मध्ये ‘मधाचे गाव‘ ही योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश स्थानिक रोजगार निर्मिती करणे आणि गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे. त्याचबरोबर पर्यटन व पर्यावरण यासाठीही ही योजना महत्त्वाची आहे.
असा असेल ‘मधाचे गाव‘ चित्ररथ
चित्ररथाच्या पुढच्या भागात फुलांनी सजवेलेली मधमाशीचे आकर्षक शिल्प बसवले आहे. Maharashtra’s ‘Honey Village’ Republic Day या मधमाशीभोवती लहान मधमाशा आणि काही फुले दाखवली आहेत. भव्य मधमाशीच्या पंखांची हालचाल दाखवण्यात आली असून लहान मधमाशा हवेत उडताना दिसतील.
नैसर्गिकरित्या असणा-या मधुमाशींच्या पोळची अचूक प्रतिकृती
चित्ररथाच्या मागील भागात एक विशाल मधमाशाचे पोळ चित्रित करण्यात आले आहेत. नैसर्गिकरित्या असणा-या मधुमाशींच्या पोळची अचूक प्रतिकृती बनविली आहे. मधमाशा त्यांच्याभोवती फिरताना दिसतात. Maharashtra’s ‘Honey Village’ Republic Day मध उत्पादनाचे टप्पे मोठ्या मधाच्या पोळ जवळ दाखवले आहेत. मध व्यवसायातील महत्त्वपूर्ण उप-उत्पादने देखील दर्शविली आहेत.
सरकारी बातम्या आणि सरकारी नोकऱ्यांचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.
. https://chat.whatsapp.com/CHchLd9jdqz2fy0m6ph0sK
मध निर्मितीच्या विविध टप्प्यातील प्रक्रिया
फुलांच्या परागीकरणातून रस शोषुन घेणाऱ्या मधमाशी प्रतिकृती दर्शविण्यात आली आहे. मध निर्मितीच्या विविध टप्प्यातील प्रक्रिया दर्शविण्यात आले आहेत. मधमाशीपालनात वापरल्या जाणाऱ्या खोक्यांवर मधाचे गाव योजनेत समाविष्ट असलेल्या काही गावांची नावे लिहिली आहेत.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या Maharashtra’s ‘Honey Village’ Republic Day मार्गदर्शनातून हा चित्ररथ तयार झाल्याची माहिती सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.