Good News मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय Class 2 land Class 1 in Marathwada

60 वर्षांपासूनची मागणी पूर्ण, लाखो नागरिकांना दिलासा मिळणार

मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश Good News

The decision to make khalsa class 2 land class 1 in Marathwada मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या जमिनी मूळ मालकाला मिळणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचे आदेश DCM Devendra Fadanvis उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यामुळे 60 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे. मुख्यमंत्री असताना श्री. फडणवीस यांनी अशाच प्रकारचा निर्णय विदर्भासाठी घेतला होता आणि लाखो शेतकऱ्यांना कसत असलेल्या जमिनींचा मालकी हक्क मिळाला होता.

https://sarkaribatmya.in/senior-citizens-welfare-corporation-cheif-ministers-of-maharashtra/

मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील या जमिनींबाबत Government Of Maharashtra निर्णय

मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील या जमिनींबाबत विविध समस्या निर्माण झाल्या होत्या. याचा विचार करून या खालसा झालेल्या इनाम जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात Mantralaya झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला होता.

Good News मराठवाड्यात साधारणतः 13,803 Hector हेक्टर इतक्या मदतमाश जमिनींचा प्रश्न मार्गी लागणार

मराठवाड्यात साधारणतः 13,803 हेक्टर इतक्या मदतमाश जमिनी आहेत. मराठवाडयातील मदतमाश इनाम जमीनीचे हस्तांतरण करण्यासाठी व परवानगीशिवाय झालेली हस्तांतरणे नियमित करुन सदर जमीनींचा दर्जा वर्ग-1 करण्यासाठी सन 2015 मध्ये नजराण्याची 50 टक्के रक्कम शासनाने निश्चित केली होती. तथापि, ही रक्कम जास्त असल्याने हस्तांतरणे नियमित करण्यासाठी कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे नजराणा रक्कम कमी करण्याची मराठवाडयातील अनेक लोकप्रतिनिंधीची मागणी होती.

प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर निर्णयार्थ ठेवण्यात यावा – उपमुख्यमंत्री 

आज झालेल्या बैठकीमध्ये मदतमाश जमिनीच्या हस्तांतरणासाठी नजुल जमिनींचे हस्तांतरण नियमित करण्याबाबत शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच मदतमाश जमिनीच्या हस्तांतरणाकरिता बाजारमूल्य 5 टक्के दराने नजराणा आकारण्यात यावा, याकरिता सदर प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर निर्णयार्थ ठेवण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले.

त्याचप्रमाणे मराठवाड्यात साधारणतः 42,710 हेक्टर इतकी खिदमतमाश जमीनी

त्याचप्रमाणे मराठवाड्यात साधारणतः 42,710 हेक्टर इतकी खिदमतमाश जमीन आहे. या खिदमतमाश जमिनींवर देखील मोठया प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. तसेच बेकायदेशीर बांधकामे देखील झालेली आहेत. त्यामुळे अशा जमिनीच्या हस्तांतरणाची तरतूद उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली होती. यास्तव मराठवाड्यातील खिदमतमाश इनाम जमिनीचे हस्तांतरणासाठी 100 टक्के दराने नजराणा आकारण्यात येऊन हस्तांतरण नियमित करण्यात यावे, याकरिता यथायोग्य प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर निर्णयार्थ ठेवण्यात यावा, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

नजराणा रकमेवरील 40% रक्कम देवस्थानच्या कायमस्वरुपी देखभालीकरिता देणार

या 100 टक्के नजराणा रकमेवरील 40% रक्कम देवस्थानच्या कायमस्वरुपी देखभालीकरिता देण्यात येणार असून 20 टक्के रक्कम देवस्थानच्या अर्चकासाठी देण्यात येणार आहे तर उर्वरित 40 टक्के रक्कम शासनाकडे जमा करण्यात येईल. उपरोक्त दोन्ही निर्णयांमुळे मराठवाड्यातील सामान्य नागरिकांचा सुमारे 60 वर्षापासूनचा प्रलंबित असलेला जमीनींसंदर्भातील प्रश्न संपुष्टात येणार आहे.

60 वर्षापासून प्रलंबित होता प्रश्न

इथून मागे इनामी जमिन मिळालेला शेतकरी महसूल कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन या संबंधी दाद मागण्याचा पुरावा करत होता. मराठवाड्यातील विविध लोकप्रतिनिधी या जमिनी वर्ग एक मधून वर्ग दोन मध्ये जमिनी व्हाव्या या करिता प्रयत्न करीत होता. शासनाच्या या निर्णयामुळे हा महत्वाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना तत्कालीन कार्यकाळात त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले होते. तो प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीकोनातून आज त्यांनी हि बैठक घेतली. परिणामी शेतकरी राजाला आता हक्काची जमीन आणि त्याचे शासनाच्या वतीने मिळणारे लाभ मिळणे सहज शक्य होणार आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हा सकारात्मक Good News निर्णय आहे 

सदर निर्णयामुळे मराठवाड्यातील  छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जवळपास 55 हजार हेक्टर जमिनी खुल्या होणार आहेत. वरील सर्व जिल्ह्यातील महसूल मंडळांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल 60 वर्षानंतर या जमीन धारकांना Good News मिळाली आहे. या प्रकरणी शासन स्तरावर आता किती गतीने कार्य केले जाते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सदर बैठकीला लोकप्रतिनिधी व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीस खासदार अशोक चव्हाण, सुरेश धस, राणा जगजितसिंह पाटील, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. विशेषतः मराठवाड्यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी अतिशय महत्वाची ठरणार आहे.

Twitter/X    https://x.com/SarkariBatmya?t=UJgd-DHj1jubm0ywII6PMA&s=09

Leave a Comment